BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

BODHISATWA DR.BABASAHEB AMBEDKAR

Sunday, August 2, 2015


त्रिशरण आणि पंचाशील 

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.

बुद्धं सरणं गच्छामी, ( बुद्धाला शरण जातो)
धम्मं सरणं गच्छामी. ( धम्माला शरण जातो)
संघं सरणं गच्छामी. ( संघाला शरण जातो)

दुतियंपी बुद्धं सरणं गच्छामी, ( दुस-यांदा बुद्धाला शरण जातो)
दुतियंपी धम्मं सरणं गच्छामी.
दुतियंपी संघं सरणं गच्छामी.

ततियंपी बुद्धं सरणं गच्छामी, (तिस-यांदा बुद्धाला शरण जातो)
ततियंपी धम्मं सरणं गच्छामी.
ततियंपी संघं सरणं गच्छामी.

पानाति पाता वेरमनिसिख्खा पदम समाधि यामी।
(हत्या  करण्याची शपथ घेतो)
अदिन्नदाना वेरमनिसिख्खा पदम समाधि यामी।
(चोरी  करण्याची शपथ घेतो)
कामेसु मिच्चाचारा वेरमनिसिख्खा पदम समाधि यामी।
(कामना  करण्याची शपथ घेतो)
मुसावादा वेरमनिसिख्खा पदम समाधि यामी।
खोटे  बोलण्याची शपथ घेतो)
सुरा मेरय मज्जापमादठाना वेरमनिसिख्खा पदम समाधि यामी।
नशा  करण्याची शपथ घेतो)
साधूसाधू !!साधू !!!
बुद्धं नममि धम्मं नमामि संघ नमामि 

Saturday, August 1, 2015

सामना ह्या मराठी चित्रपटाविषयी 
सामना' या चित्रपटाला चाळीस वर्षे होत असताना आजही तो ताजा वाटतो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या चित्रपटातील हिंदुराव धोंडे-पाटील या पात्रातून दिसणारी राजकीय- सत्ताधारी प्रवृत्ती आजही जागोजागी दिसतेच. आज दिसत नाहीत, ते 'मास्तर'. जागल्याचे काम करणारे 'मारुती कांबळे' आहेत, पण 'मारुती कांबळेचं काय झालं' हा प्रश्न ऐकू येत नाही..
राजकारण सर्वाना आवडते. राजकारणी, त्यांची लफडी-कुलंगडी, शह-काटशह, कलगी-तुरे हे सर्व सर्वाना वाचण्यास आवडते. सर्वाना राजकीय मते असतात. म्हणजे आम्हाला राजकारण आवडत नाही हे म्हणणे हेसुद्धा एक राजकीयच मत असते. याचे कारण माणूस स्वभावत: राजकारणी असतो. प्रत्येकाचे 'पॉलिटिक्स' वेगळे. ते तो खेळत/जगत असतो. घरात, दारात, कचेरीत. या राजकारणाने आज समाजाचे प्रत्येक क्षेत्र व्यापलेले आहे. ते टाळून आपण कुठे जाऊच शकत नाही. वास्तव असे असताना मराठी साहित्यात सत्तेच्या या खेळाचे कितपत प्रतििबब दिसते? उत्तरादाखल आपल्यासमोर येतात त्या अगदी मोजक्याच कादंबऱ्या. चित्रपट क्षेत्राचीही तीच अवस्था. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असे राजकीय चित्रपट मराठीत झाले आहेत. तशी राजकीय पात्रे अनेक चित्रपटांत दिसली. तमाशापटांतला अविभाज्य भाग असलेला लंपट-मग्रूर पाटील हाही राजकीय व्यवस्थेचाच प्रतिनिधी. परंतु ती सगळी राजकारणाची विद्रूपचित्रे होती. राजकीय व्यवस्थेचा तळ गाठणे हे त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. मराठीत पहिल्यांदा हे काम 'सामना'ने केले. यंदा या चित्रपटाला चाळीस वष्रे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा समजून घेणे आवश्यक आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आजही हा चित्रपट तितकाच ताजा वाटत आहे. वस्तुत: चाळीस वष्रे हा काही वाटतो तितका कमी काळ नाही. आजच्या तंत्रयुगात दोन-तीन वर्षांनी पिढीबदल होत असताना चाळीस वर्षांचा काळ तर जणू शतकाएवढा मोठा वाटतो. या काळात बदलही आमूलाग्र झाले. समाजाची घडी बदलली. बाजारपेठांचे नियम बदलले. त्याचा परिणाम सामाजिक नात्यांपासून कौटुंबिक संबंधांपर्यंत आणि नीतिमूल्यांपर्यंत सगळ्यावर झाला. अशा परिस्थितीत कलाकारांनी निळे कपडे घालून चित्रित केलेल्या काळ्या-पांढऱ्या रंगातील सामनाचे कालसुसंगत राहणे हे त्या चित्रपटाचे यश मानायचे की आपले सामाजिक अपयश हा खरा आजचा प्रश्न आहे.
सामना कालसुसंगत आहे असे म्हणताना तो ज्या काळातून आला तो काळ समजून घेणे गरजेचे आहे. हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदíशत झाला. महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन तेव्हा १५ वष्रे उलटली आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर राज्याच्या राजकीय नेतृत्वाचा आस पांढरपेशा वर्गाकडून ग्रामीण भागाकडे वळलेला आहे. याचे कारण येथील सहकाराची चळवळ. आणि त्याच वेळी ७२चा दुष्काळ, तेव्हाचा पीएल ४८० खाली अमेरिकेने पाठवलेला काळपट गहू, त्याबरोबर आलेले काँग्रेस गवत, रोहयोची कामे लोकांच्या अजूनही स्मरणात आहेत. तिकडे बिहार, गुजरातमध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे नवनिर्माण आंदोलन जोरात सुरू आहे आणि इकडे महाराष्ट्रातील शहरी बुद्धिजीवी वर्ग सोडला तर त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही. मधल्या काळात सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात नवे कारखाने, दूधडेअऱ्या, पोल्ट्रीफार्म उभे राहात होते. त्यातून एक नवी अर्थव्यवस्था जन्माला आली होती आणि तिची सूत्रे या नवकारखानदारांच्या हाती होती. ही खरे तर लोकशाहीच्या डगल्यातील नवसरंजामशाही व्यवस्थाच. सामना चित्रपटातील िहदुराव धोंडे-पाटील थंडीने कुडकुडणाऱ्या मास्तरांच्या अंगावर शाल टाकताना म्हणतात, 'ही थंडी आमच्या राज्यातली हाय मास्तर. आम्हाला नाही बाधणार.' हा या नवसामंतांचा उद्गार. ही भावना, ही व्यवस्था तशी भारतीय गावगाडय़ाच्या अंगवळणी पडलेली. वर आदिलशाही असो, निजामशाही असो वा लोकशाही, ती जोवर या गावगाडय़ाला खीळ घालीत नाही तोवर मान वर करूनही पाहायचे नाही ही येथील शतकानुशतकांची रीत. ती या नवसरंजामशाहीला पोषकच होती. परंतु त्याच वेळी मताचा अधिकार आणि हाती आलेला पसा यामुळे ग्रामीण भागातील आजवर दबल्या गेलेल्या जातसमूहांतही आता सत्ताकांक्षा निर्माण होत होती. तो संघर्ष एव्हाना ठिकठिकाणी रंगू लागला होता. दलितांवरील अत्याचार वाढले ते याच काळात. हातून सत्ता गेलेल्या पांढरपेशा वर्गाला हे सगळे बदल वृत्तपत्रांतून समजत होते आणि या नवसामंती व्यवस्थेने त्याच्या आधुनिक प्रेरणांवर चरे जात होते. सामना हे त्या चरचरीचे चित्र आहे. मास्तर हा भ्रमनिरास झालेला, हरलेला, आजवर जपलेल्या आदर्शापासून पळू पाहणारा, विरक्तीला वासनेचा ताजा कलम जोडू पाहणारा परंतु तरीही गांधीबाबाने पछाडले असल्याने सत्यासारख्या काही मूल्यांमागे धावणारा हतभागी स्वातंत्र्यसनिक हा त्या पराभूत पांढरपेशांचा प्रतिनिधी आहे. या टोपीखाली आणि मुकुटाखाली नेमके काय दडले आहे हा त्याला सतत छळणारा प्रश्न होता. सामनात िहदुरावची अवघी सामाजिक आणि अर्थसत्ता मास्तरच्या बुद्धीपुढे हरते. त्याला बेडय़ा पडतात आणि चित्रपट संपतो. हे आदर्शवत् होते, गोड होते, परंतु ते वास्तवाला धरून होते की काय याबद्दल मात्र शंका आहे. खरे तर ते स्वप्नरंजनच. याचे कारण िहदुराव धोंडे-पाटील तसे हरत नसतात. कारण िहदुराव ही व्यक्ती नसते. ती व्यवस्था असते. महाराष्ट्राच्या पुढील राजकीय वाटचालीने हेच अधोरेखित केले आहे.
राज्याच्या राजकारणातील काँग्रेसची सद्दी आज कमी झाली आहे. सहकाराचे तीनतेरा वाजले आहेत. ज्यांच्या बापजाद्यांनी ही चळवळ उभारली तेच आज तिचे खांदेकरी झाले आहेत. एकीकडे आपले सहकारी साखर कारखाने अवसायनात काढायचे आणि दुसरीकडे आपणच ते विकत घेऊन फायद्यात चालवायचे, असा एक नवा खेळ या नवसामंतांनी सुरू केला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील जनतेचेही सहकारावरील अवलंबित्व कमी होत असून, तेथील अर्थव्यवस्थेला नवे धुमारे फुटत आहेत. एके काळी शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळख असलेला भारतीय जनता पक्ष या बदलांवर मांड ठोकून आज काँग्रेसी व्यवस्थेला आव्हान देत आहे. अशा परिस्थितीत येथील तमाम िहदुराव एक तर नामशेष व्हायला हवे होते किंवा आत तरी जायला हवे होते. परंतु तसे घडलेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पोसलेल्या सुभेदारी पद्धतीमुळे येथील पक्ष संघटना कमकुवत झाल्या. याचा निर्लज्ज लाभ भाजप घेत असून एके काळचे काँग्रेसी िहदुराव आज गळ्यात भगवे उपरणे गुंडाळून फिरत आहेत. याचा अर्थ ग्रामीण भागातील राजकीय व्यवस्थेचा केवळ वाण बदलला. गुण तोच राहिला. या व्यवस्थेत मास्तर मात्र हरवला. मास्तरमध्ये व्यवस्थेला थेट भिडून प्रश्न विचारण्याचे सामथ्र्य होते. सामनामध्ये िहदुराव आपल्या सत्तेला आव्हान देऊ पाहणाऱ्या मारुती कांबळे या दलित अपंग सनिकाचा काटा काढतो. त्या मारुती कांबळेचे काय झाले हा मास्तरचा प्रश्न आहे. आजही तोच सवाल कायम आहे. सत्तेला आव्हान देणाऱ्या तमाम मारुती कांबळ्यांचे काय झाले? त्यांच्या आरटीआय अर्जाचे काय झाले?
म्हणूनच चाळिशीतला हा सामना आजही सुसंगत आहे. पण म्हणून आज कोणी तो पुन्हा काढायला जाऊ नये. राजकीय व्यवस्थेचे पापुद्रे काढणारे चित्रपट काढण्याची आपणास सवय नाही. तरीही तो कोणी पुन्हा काढू गेले तर मात्र त्यातील मास्तर हे पात्र कुठून आणणार हाच प्रश्न पडेल. आणि आणले तरी ते हा सामना जिंकतीलच याची मात्र हमी नाही. कारण हा सामनाच मुळी कॉर्पोरेट िहदुरावांनी आखलेला असेल.



साभार लोकसत्ता 

विज्ञानेश्वराचे प्रस्थान

कोळ्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम या पोरास वैमानिक व्हावयाचे होते. तशी संधी आली असता ती त्यास नाकारली गेली. हवाई दलाचे वैमानिक होण्यासाठी ते अपात्र ठरले. ते योग्यच झाले. कारण विमानास पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बंध तोडण्याचा अधिकार नसतो. कितीही शक्तिशाली असले तरी विमान पृथ्वीच्या वातावरणाच्या मर्यादा सोडत नाही. एखादा काँकार्ड विमानाचा अपवाद. अन्यथा विमान आपल्या अंगभूत मर्यादेतच घुटमळत राहते. एपीजे कलाम यांच्या आकांक्षेस ती मर्यादा मानवली नसती. त्यांना अवकाश खुणावत होते. साध्या समूहगानास अपात्र ठरलेल्या एखाद्या गायकाने पुढे स्वत:ची एकल बठक भरवण्याइतकी गाण्यात प्रगती करावी, तसे हे झाले. आकाशयानासाठी अपात्र ठरलेले एपीजे पुढे इतके वाढले की ते आकाशाच्या सीमा ओलांडून अवकाशाकडे झेपावले. कलाम यांचे उड्डाणप्रेम इतके तीव्र की वैमानिक म्हणून नाकारले गेल्यानंतर त्यांनी या क्षेत्राशी संबंध राहावा म्हणून िहदुस्थान एअरोनॉटिक्समध्ये कनिष्ठ पदाची नोकरी पत्करली. रामेश्वरसारख्या दूरस्थ खेडय़ात जन्मलेला, साध्या शालेय शिक्षणासाठीदेखील वर्तमानपत्र टाकण्याचे काम करून अर्थार्जन करावे लागलेला एक गरीब मुलगा देशाचा राष्ट्रपती आणि अवकाश क्षेत्राचा चेहरा बनून जातो, ही कहाणीच विलक्षण प्रेरणादायी आहे. कलाम यांच्याभोवती जी काही प्रभावळ तयार झाली ती या पाश्र्वभूमीमुळे. ज्या समाजात प्रचंड मोठय़ा घटकास वंचित राहावे लागते, ज्या समाजात प्रगतीच्या संधीचा सुग्रास घास मूठभरांच्याच ताटात सहज पडतो त्या समाजात रामेश्वरात मुसलमान कुटुंबात जन्माला येऊन धर्म, जात, प्रांत, भाषा अशी सर्व बंधने ओलांडून अवकाशाकडे झेपावणारे कलाम आदर्श आणि अनुकरणीय ठरतात यात नवल नाही.क्रायोजेनिक इंजिनांच्या साहाय्याने मोठे उपग्रह अवकाशात सोडण्याचे क्षेत्र असो की अणुस्फोट चाचणी, डॉ. अब्दुल कलाम यांचा त्यात मोठा वाटा होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक मानसन्मान मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती बनले. तेथेही त्यांच्या कार्यामुळे त्या पदाची उंची वाढली. कलाम असे उंचच राहिले. या उंचीचा त्यांना ध्यास होता. ते त्यांचे प्रेयस होते आणि आपल्या जगण्याने त्यांनी ते श्रेयसही केले.
वास्तविक कलाम यांच्या आधी अवकाश वा तत्संबंधी क्षेत्रात भारतात काही घडत नव्हते असे नाही. विक्रम साराभाई, त्यांचे पूर्वसुरी होमी भाभा आदींनी विज्ञानक्षेत्राची मजबूत पायाउभारणी आपल्याकडे केली होतीच. या धुरंधरांना पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या द्रष्टय़ाचे नेतृत्व लाभल्याने त्या काळातील प्रगती खरोखरच वाखाणण्याजोगी होती. परंतु तरीही या सर्व महानुभावांना कलाम यांच्यासारखी लोकप्रियता मिळाली नाही. ते सर्वच आदरणीय होते. पण त्यांच्याविषयीचा आदर दडपणाच्या कोंदणातून यायचा. कलाम यांचे तसे नाही. त्यांची तुलनाच करावयाची झाल्यास ती महात्मा गांधी यांच्या राजकीय नेतृत्वाशी करावी लागेल. महात्मा गांधी यांच्या आधीही लोकप्रिय राजकारणी होते. परंतु एक बाळ गंगाधर टिळक यांचा अपवाद वगळता ते जनसामान्यांना आपलेसे वाटत नसत. महात्मा गांधी यांनी रस्त्यावरच्या जनसामान्यांच्या देशप्रेमासही किंमत दिली. देशासाठी आपणही काही करू शकतो असे सामान्यांतल्या सामान्यास वाटू लागणे हे महात्मा गांधी यांचे यश. विज्ञान क्षेत्राच्याबाबत हे पुण्य कलाम यांच्या खाती जमा होते. आपणास जे साध्य करावयाचे आहे ते होईपर्यंत प्रयत्न करीत राहणे हे त्यांचे वैशिष्टय़. अशा प्रयत्नांवर निष्ठा असणाऱ्यांना फार दूरचे दिसते. कलामांना तसे दिसत असे. त्यामुळे अमेरिका आदी बडय़ा देशांनी भारतावर र्निबध घातले तरी भारतीय तंत्रज्ञ त्यातून मार्ग काढू शकतात, हा विश्वास त्यांना होता आणि स्वत:चाच विश्वास सार्थ ठरवून दाखवण्याची धमक त्यांच्यात होती. बडय़ा देशांनी १९७४ साली अणुचाचण्या केल्या म्हणून भारतास युरेनियमपुरवठा बंद करण्याची शिक्षा दिली. त्यानंतरही न डगमगता भारतात.. त्यातही रामेश्वरच्या किनारपट्टी परिसरात.. प्रचंड प्रमाणावर आढळणाऱ्या थोरियमचा वापर करून युरेनियम तयार करता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखवण्याचे महान कार्य ज्या तंत्रज्ञांनी करून दाखवले त्यात कलाम यांचा अंतर्भाव होतो. सामान्य नागरिकास कदाचित याचे महत्त्व कळणार नाही. परंतु थोरियमचे हे गुणदर्शन भारतासाठी अत्यंत दूरगामी महत्त्वाचे आहे, हे नि:संशय. याच काळात भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात मोठय़ा घडामोडी घडत होत्या. क्रायोजेनिक इंजिनांच्या साहाय्याने मोठे उपग्रह कसे अवकाशात सोडता येतील, यासाठी बरेच संशोधन सुरू होते. कलाम यांचा त्यात मोठा वाटा आहे. आज या क्षेत्रात पाच बडय़ा देशांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची योग्यता ज्या देशांनी मिळवली त्यात भारतासारख्या दरिद्री देशाचा समावेश होतो. हे यश कलाम, डॉ. अनिल काकोडकर अशा तंत्रज्ञांचे. त्या अर्थाने कलाम हे उच्च दर्जाचे अभियंते होते. आपल्याकडे विज्ञानक्षेत्राशी संबंधित सर्वानाच वैज्ञानिक म्हटले जाते. कलाम हे तसे वैज्ञानिक नव्हते. हे काही त्यांच्यातील न्यून नाही. खुद्द कलाम यांना आपल्यातील या तंत्रज्ञाची जाणीव होती. तरीही एखादा वैज्ञानिकही करू शकणार नाही, असे एक मोठे काम त्यांच्या हातून घडले.
ते म्हणजे विज्ञान प्रसाराचे. कलाम मूíतमंत विज्ञानवादी, प्रयत्नवादी होते. ही बाब आपल्यासारख्या दांभिक समाजात अत्यंत महत्त्वाची. याचे कारण विज्ञान आणि धर्मातील कर्मकांड या दोन्ही डगरींवर तोल सांभाळत जगणाऱ्यांची संख्याच आपल्या समाजात जास्त. ही कसरत कलाम यांनी कधीही केली नाही. जाणीवपूर्वक. देशातील सर्वोच्च पदावर निवड झाल्यावर त्यांनी राष्ट्रपती भवनात निवास करणे क्रमप्राप्त होते. तेव्हा कोणत्या मुहूर्तावर आपण राष्ट्रपती भवनात राहावयास येणार असे सरकारने विचारले असता, कलाम यांनी उत्तर दिले.. प्रत्येक दिवस माझ्यासाठी सुमुहूर्त असतो. आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. कलाम त्याप्रमाणेच वागले. भूमिका अशी घ्यावयाची आणि चोरून मुहूर्त पाहावयाचा असली लबाडी करण्याची वेळ त्यांच्यावर कधीही आली नाही. विचार आणि वागणे यांच्याशी त्यांचा थेट संबंध होता. त्यामुळे वेगवेगळ्या श्रेयांसाठी ओळखले जात असतानाही आपल्याला विज्ञानवादी शिक्षक ही ओळख सर्वात प्रिय आहे, असे कलाम म्हणत. विज्ञानाची विविध गुह्य़े जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे त्यांना मनापासून आवडे. ते हे काम न कंटाळता करीत. अणुऊर्जा आयोगाशी संबंधित असताना मुंबईत त्यांचे वारंवार येणे असे. त्या वेळी कलाम यांच्याशी अनेकदा संवाद झाला. विज्ञानविषयक वार्ताकन करणारे वार्ताहर त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत. परंतु त्यातील एकाही प्रश्नाला वा प्रश्नकर्त्यांला कलाम यांनी कमी लेखले असे झाल्याचे एकही उदाहरण नाही. काही काही विषयांवर भाष्य करण्यात त्यांना अंगभूत मर्यादा येत. ते कलाम पाळत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने कधीही वाद वगरे झाले नाहीत.
हे त्यांचे स्वभाववैशिष्टय़ होते. त्यांच्या हयातीत के. संथानम, होमी सेठना आदींनी कलाम यांच्यावर थेट टीका केली आणि त्यांच्या क्षमतेसंदर्भात काही प्रश्नही उपस्थित केले. त्यास उत्तर देण्याच्या फंदात कलाम कधी पडले नाहीत. खरे तर अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कालखंडात कलाम भारतीय अणुऊर्जा क्षेत्राच्या केंद्रस्थानी होते. अमेरिका ते सोविएत रशिया या टापूत बरेच काही घडत होते आणि बऱ्याचदा भारतही त्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होता. परंतु यातील कशाचीही वाच्यता कलाम यांच्या आत्मचरित्रात नाही. एका अर्थाने ही त्यांची मर्यादादेखील ठरते. पण अशा मर्यादेची एक बाजू चांगुलपणाची असते. कलाम यांच्या राष्ट्रपती भवनातील वास्तव्यात ती दिसून आली. २००४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस बहुमताच्या जवळ गेल्यावर पंतप्रधानपदी सोनिया गांधी यांची निवड होणार हे स्पष्ट होते. परंतु तसे झाले नाही. गांधी यांनी ऐन वेळी माघार घेतली. त्या वेळी त्यांचे परदेशी मूळ लक्षात घेऊन राष्ट्रपती कलाम यांनी त्यांना पंतप्रधानपद न स्वीकारण्याची मसलत दिली, असे बोलले गेले. कलाम यांनी त्या विषयी कधीही ब्रदेखील काढला नाही. राष्ट्रपती म्हणून मुदत संपल्यावर त्यांना आणखी एक संधी दिली जाणार होती. ती खुद्द कलाम यांनी अव्हेरली. पद नाकारणारे भारतासारख्या देशात दुर्लभच ठरतात आणि तसे कोणी आढळल्यास भाबडी जनता अशा व्यक्तीस आनंदाने ऋषिपद बहाल करते. कलाम यांना ते तसे मिळाले. त्यांचा मोठेपणा हा की या ऋषिपदास तडा जाईल अशी एकही कृती कलाम यांच्या हातून घडली नाही. त्यात जोडीला असलेला अंगभूत साधेपणा. भारतात लोकप्रियतेच्या शिखराचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळण्यासाठी या बाबी पुरेशा ठरतात. अशा व्यक्तींना पदासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, पदच त्यांचा शोध घेत येते. कलाम यांचे तसे झाले. त्यामुळे पीसी अलेक्झांडर यांच्या ऐवजी राष्ट्रपतिपदाचे सर्वसंमत उमेदवार म्हणून कलाम यांची निवड झाली. अलेक्झांडर हे एके काळी काँग्रेसला जवळचे. दिवंगत इंदिरा गांधी यांचे विश्वासू. तेव्हा त्यांच्या नावास काँग्रेस आक्षेप घेणार नाही, हा अटलबिहारी वाजपेयी सरकारातील प्रमोद महाजन यांचा होरा. तो चुकला. कारण सोनिया गांधी यांनी अलेक्झांडर यांना पािठबा नाकारला. त्यानंतर कलाम यांचे नाव पुढे केले गेले. ते मान्य झाले. त्यांना राष्ट्रपतिपदासाठी उभे करण्यात खरे तर एक राजकारण होते. परंतु या राजकारणाचा गंध राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यावर दूरान्वयानेही कलाम यांच्या वागण्यास आला नाही. ते होते तसेच राहिले. उलट त्यांच्यामुळे त्या पदाची उंची वाढली.
कलाम हे असे उंचच राहिले. या उंचीचा, अनंत उंचीचा त्यांना ध्यास होता. ते त्यांचे प्रेयस होते आणि आपल्या जगण्याने त्यांनी ते श्रेयसही केले. ते विविधांगी जगले. या सर्व अवतारांत एक सूत्र समान होते. ते म्हणजे विज्ञानप्रेम. ते कधीही आटले नाही. त्या प्रेमाचाच आविष्कार होता विद्यार्थाशी गप्पा. या अशा गप्पांतच त्यांच्या आयुष्याची इतिश्री व्हावी हा एक विलक्षण योगायोग. तो आणखी एका कारणाने उठून दिसतो. भद्र-अभद्र, शुभ-अशुभ वगरे काहीही न मानणाऱ्या कलाम यांचे सोमवारी निधन झाले. श्रद्धाळू, धर्म-अधर्माच्या गत्रेत अडकलेला जनसमुदाय आषाढी एकादशी पाळून आपल्या खात्यात काही पुण्य जमा व्हावे यासाठी मग्न असताना या विज्ञानेश्वराने अनंताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली.
साभार लोक्सत्ता 
फोटो नं.


कार्ल्याच्या लेण्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत. पण एकवीरा नावाच्या देवीने ईथे घूसखोरी केलेली आहे. आमच्या या बौद्ध लेण्यांच्या मुख्य़ द्वारातच एकवीरा देवीनी आपलं बस्तान बसवलं. कार्ल्याच्या लेण्यातील मुख्य बौद्ध स्तूपाच्या अगदी दारातच उजव्या कोप-यात एकवीरा देवीचं हे मंदीर म्हणजे बौद्ध धर्मीयांचा हिंदूनी केलेला जातीयवादी छळ होय. मंदिर बनवायचंच होतं तर संबंध डोंगर पडलं होतं. किंवा दुसरीकडेही मोकळी जागा होती. पण मंदिर उभं करण्या मागचा हेतू जातीयवादी असल्यामूळे बौद्ध स्तूपाच्या अगदी दारातच हे मंदीर उभं करण्यात आलं. या मंदिरामूळे आत जाण्याचा अर्धा मार्ग हिंदूनी गिळंकृत केला. आपल्याला आत जाण्यासाठी अर्धाच रस्ता सोडण्यात आला.
फोटो नं.  
या फोटोट देवीचं मंदिर थोडसं दिसतं. त्या उजव्या कोप-तात निट बघा. अन तिकडे मागे जे दिसत आहे ते बौद्ध स्तूपाच्या मूख्य द्वाराचा भाग आहे. अगदी या मूख्य द्वारातच देवीला बसायची ईच्छा झाली. 
फोटो नं. ३
या फोटोत मधोमध जे  शेंदूरी रंगाचा मंदिर दिसतेय ते एकवीरा देवीचं मंदिर आहे. आत जाणा-या मूख्य वाटेतील हे मंदिर बौद्ध स्तूपावरील अतिक्रमण होय हे सांगण्याची गरज नाही ईतकी बोलकी परिस्थीत असुनही आम्हाला ब्र शब्द बोलण्याची परवानगी नाही. 
फोटो नं. ४
हा फोटो बघा. बौद्ध स्तूपात जाणारा हा एकमेव रस्ता. समोर दिसतय ते भव्य बौद्ध स्तूपाचं प्रवेश द्वार. डाव्या बाजूल दिसणारा भव्य स्तंभ हा अशोक स्तंभ होय. चउजव्या हाताला दिसणारा पसारा/बांधकाम हे एकवीरा देवीने स्तूपाच्या प्रवेशद्वारावर केलेलं अतिक्रमण होय. पायत चपला नघालता चालणारी जी लोकं दिसतायत ती सर्व देवभक्त होतं. अगदी प्रवेशद्वारावर होम-हवन घालण्यात आला आहे.  या होम-हवनामूळे बौद्ध बांधवाना स्तूपात जाण्यासाठीचा मार्ग बंद करण्यात आला. जो पर्यंत होम हवन चालू होतं तो पर्यंत बौद्ध स्तूपात जाण्यास बंधी घालण्यात आली. त्या नंतरही कित्येक तास लोकांनी होम हवनातील राख  पवित्र राख म्हणून उचलण्याचा कार्यक्रम चालविला.
फोटो नं. ५
हा त्या प्रवेशद्वारातील डाव्या हातावरील भव्य अशोकस्तंभ होय. चार दिशांवर नजर ठेवणारे हे चार सिंह म्हणजे शत्रूच्या उरात धडकी बसविणारं प्रतीक. पण आज आमची अवस्था ईतकी बिकट व दुर्बल झाली की, सिंहांच्या पायथ्याशीच एकवीरेनी बस्तान मांडलं. वरुन स्तूपात जाण्याचा रस्ता अडविला.
फोटो नं. ६
या फोटोत बघा, कसं स्तूपाचं मुख्य़ दरवाजा एकवीरेनी हडपलाय. मुख्य दाराला थेटून बांधलेलं हे एकवीरेचं मंदिर बौद्धाना अव्हान देणारं आहे. या मंदिरात दर्शन घेणारे भक्त नुसतं दर्शन घेत नाहीत. तर प्रचंड प्रमाणात आरडा ओरडा चालू असतो. आत स्तूपात शांत पणे स्तूप दर्शन घेणा-या लोकाना याचा प्रचंड त्रास होतो. एवढयावरच थांबले तर ते हिंदू कसले. मंदिरावर लावलेलं लाऊडस्पिकर बघा. या लाऊड स्पिकर जोर जोरात वाजवून, एकवेरेची गाणी लावून बौद्ध बांधवाना भंडावून सोडविण्याचं काम भक्तगण करत असतात.
फोटो नं. ७ 
होम-हवन संपल्यावर सुद्धा स्तूपात जाणारी वाट मोकळी करण्यात आली नाही. उलट भक्तीभावाने होमचे दर्शन घेणारी लोकं अनवाणी पायानी कशी राख उचलण्यात मग्न झालित ते बघा. होम संपल्यावर सुद्धा आम्हाला प्रवेशा साठी आडकाठी आणणारी हि लोकं दांभिक नाहीत काय? तरी सुद्धा आम्ही शांत पणे प्रवेशासाठी संयमाचे धडे गिरवित होतो.
फोटो नं. ८
या फोटोत होम मधली राख उचलणारी बायी बघा. अन अगदी तीच्या मागे जे मंदिराचं दार आहे त्यातून भक्तांची उडालेली झुंबड बघा. बौद्ध स्तूपात जाण्यासाठी मार्ग कशा प्रकारे बंद करण्यात आला होता हे या फोटो अगदी स्पष्टपणे दिसत आहे
फोटो नं. ९
स्तूपाचं मुख्य दार होम टाकून अडविल्यावर मनसोक्तपणे पूजा पाठ करणारे एकवीरा भक्त हे विसरलेत की आपण स्तूपाचं द्वार अडवून बसलो आहोत. याना स्तूपात जाणा-यांची गैरसोय होते यांशी काही देणे घेणे नाही.
स्तूपाच्या प्रवेश द्वारातीवरील होम, अन या होमचे दर्शन घेऊन मंदिराच्या आत डोकावणारी हि लोकं. खरंतर फोटोत दिसणारं बौद्ध स्तूपाच्या दिशेनी उघडणारं हे दार बंद होतं. तरी सुद्धा भक्तानी त्या दारात गर्दी केली व स्तूपाचा रस्ता रोखून धरला. स्तूपात जायला पुर्णपणे अडवणूक केली गेली होती. 
फोटो नं. १३
हा बघा मंदिराचा तो दरवाजा जो बौद्ध स्तूपाकडे उघडतो. या दरवाजातून देवीचे दर्शन घेणा-यांची अधून मधून उडणारी झुंबड बौद्ध स्तूपाच्या वाटेत थेट अडथडा निर्माण तर करतेच पण वरुन त्या वाटेत घातलेल्या होम-हवनानी आज बौद्ध बांधवांची पार वाट लावली.
पूजेचं ताट घेऊन थाटात मिरवणारे भक्तगण. पण या भक्ताना एवढं सुद्धा भान नाही की ते जिथे वावरत आहेत ती जागा बौद्धांची आहे. व मागे जे दिसत आहे ते पवित्र स्तूप आहे.
फोटो नं. २१
हा दूरुन घेतलेला फोटो बघा. यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की कशा प्रकारे भव्य अशा बौद्ध स्तूपाच्या मुख्य दरवाज्यात देवीचं मंदिर बांधून बौद्धांच्या पवित्र स्थानांवर आक्रमण करण्यात आलं. डाव्या बाजूला दिसणारं बौद्ध स्तूपाचं भव्य प्रवेश द्वार बघा अन त्याच्या शेजारीचा जातीयवादी मंदिर बघा.  राम मंदिराचं निमित्य करुन मुस्लिमांवर अतिक्रमणाचा अरोप करणार हिंदू व त्याच्या मदतीला धावणारा मिडीया हे दोघं मिळून अयोध्या प्रकरणावरुन देश पेटवून देतात. पण याच्या अगदी उलट हिंदूनी  ईथे बौधांच्या स्तूपांवर केलेल्या अतिक्रमणा बद्दल मात्र हाच मिडीया मूग गिळून बसतो. किंबहून बौद्धाना दामदाटी करुन पिटाळून लावण्यात येते. काल अशोक विजयादशमीच्या शूभदिनी धम्मकच्रपर्वतनाच्या निमित्तानी मी सहकुटुंब या ठिकाणी गेलो. तेंव्हा हा प्रकार बघून थक्क झालो. मी विरोध केला, पण मला दम भरण्यात आलं. मी थेट आमदाराना फोन लावून विचारणा केल्यावर त्यानी सुध्दा मलाच दम भरला. उपस्थीत पोलिसांना भेटुन या बद्दल विचारल्यावर त्यानी हात झटकले. अशा वेळी आम्ही काय करावं? कुणाकडे जावं? मुस्लिमांच्या नावानी धर्मिक अतिक्रमणाचे खडे फोडनारे बौद्ध स्तूपावर अतिक्रमण करतात तेंव्हा कायदाही मदतीला येत नाही. आपण सर्वानी एकवटून या देवीला कार्ल्यातून पिटाळून लावता येईल का यावर विचार करु या. डॉ. परम आनंदनी ही मोहिम आधिच हाती घेतली आहे. आता गरज आहे ती आपण सर्वानी त्यांच्या या लेनी बचाव चळवळीला हातभार लावण्याची.
















Friday, July 31, 2015

buddha vandana

बुद्धं सरणं गच्छामी

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.


बुद्धं सरणं गच्छामी, ( बुद्धाला शरण जातो)
धम्मं सरणं गच्छामी.
 ( धम्माला शरण जातो)
संघं सरणं गच्छामी. ( संघाला शरण जातो)

दुतियंपी बुद्धं सरणं गच्छामी,
 ( दुस-यांदा बुद्धाला शरण जातो)
दुतियंपी धम्मं सरणं गच्छामी.
दुतियंपी संघं सरणं गच्छामी.

ततियंपी बुद्धं सरणं गच्छामी,
 (तिस-यांदा बुद्धाला शरण जातो)
ततियंपी धम्मं सरणं गच्छामी.
ततियंपी संघं सरणं गच्छामी.

पानाति पाता वेरमनि, सिख्खा पदम समाधि यामी।

(हत्या न करण्याची शपथ घेतो)
अदिन्नदाना वेरमनि, सिख्खा पदम समाधि यामी।
(चोरी न करण्याची शपथ घेतो)
कामेसु मिच्चाचारा वेरमनि, सिख्खा पदम समाधि यामी।
(कामना न करण्याची शपथ घेतो)
मुसावादा वेरमनि, सिख्खा पदम समाधि यामी।
( खोटे न बोलण्याची शपथ घेतो)
सुरा मेरय मज्जा, पमादठाना वेरमनि, सिख्खा पदम समाधि यामी।
( नशा न करण्याची शपथ घेतो)
बुद्ध पुजा (Buddha Puja)
वण्ण-गन्ध-गुणोपेतं एतं कुसुमसन्तति ।
पुजयामि मुनिन्दस्य, सिरीपाद सरोरुहे ।१।

पुजेमि बुद्धं कुसुमेन नेनं, पुज्जेन मेत्तेन लभामि मोक्खं ।
पुप्फं मिलायति यथा इदं मे, कायो तथा याति विनासभावं।२।

घनसारप्पदित्तेन, दिपेन तमधंसिना ।
तिलोकदीपं सम्बुद्धं पुजयामि तमोनुदं ।३।

सुगन्धिकाय वंदनं, अनन्त गुण गन्धिना।
सुगंधिना, हं गन्धेन, पुजयामि तथागतं ।४।

बुद्धं धम्मं च सघं, सुगततनुभवा धातवो धतुगब्भे।
लंकायं जम्बुदीपे तिदसपुरवरे, नागलोके च थुपे।५।

सब्बे बुद्धस्स बिम्बे, सकलदसदिसे केसलोमादिधातुं वन्दे।
सब्बेपि बुद्धं दसबलतनुजं बोधिचेत्तियं नमामि।६।

वन्दामि चेतियं सब्बं सब्बट्ठानेसु पतिठ्ठितं।
सारीरिक-धातु महाबोधि, बुद्धरुपं सकलं सदा।७।


१. त्रिरत्न वंदना ( Triratna Vandana)
इति पि सो भगवा अरहं, स्म्मासम्बुद्धो,
विज्जाचरणसम्पन्नो, सुगतो, लोकविदु, अनुत्तरो,
पुरिसदम्मसारथि, सत्था देव अनुस्सानं, बुद्धो भगवाति।
बुद्धं जीवितं परियन्तं सरणं गच्छामि ।
ये च बुद्धा अतीता च, ये च बुद्धा अनागता।
पच्चुपन्ना च ये बुद्धा, अहं वन्दामि सब्बदा।
नत्थि मे सरणं अञ्ञं, बुद्धो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंङ्गलं ।
उत्तमग्गेन बदे हं पादपंसु वरुत्तमं।
बुद्धे यो खलितो दोसो, बुद्धो खमतु तं ममं।
यन्कीची रतनं लोके विज्जाती विविधा पतू 
रतनन बुद्ध  समनत्ति ,तस्मा सोत्थि भवन्तु ते 
२. धम्म वंदना (Dhamma Vandana)
स्वाक्खातो भगवता धम्मो सन्दिट्ठिको अकालिको,
एहिपस्सिको ओपनाय्यिको पच्चतं वेदित्ब्बो विञ्ञुही’ति।
धम्मं जीवित परियन्तं सरणं गच्छामि।
ये च धम्मा अतीता च, ये च धम्मा अनागता।
पच्चुपन्ना च ये धम्मा, अहं वन्दामि सब्बदा।
नत्थि मे सरणं अञ्ञं धम्मो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं।
उत्तमङ्गेन वन्देहं, धम्मञ्च दुविधं वरं।
धम्मे यो खलितो दोसो, धम्मो खमतु तं ममं।
यन्कीची रतनं लोके विज्जाती विविधा पतू 
रतनन धम्म समनत्ति ,तस्मा सोत्थि भवन्तु ते


३.संघ वंदना (Sangh Vandana)
सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो, उजुपतिपन्नो भगवतो सावकसंघो,
ञायपटिपन्नो भगवतो सावकसंघो, सामीचपटिपन्नो भगवतो सावकसंघो।
यदिदं चत्तारि पुरिसयुगानी, अठ्ठपुरिसपुग्गला
एस भगवतो सावकसंघो, आहुनेय्यो, पाहुनेय्यो,
दक्खिनेय्यो, अञ्जलिकरणीयो, अनुत्तरं पुञ्ञक्खेतं लोकस्सा’ति॥
संघं जीवित परियन्तं सरणं गच्छामि।
ये च संघा अतीता च, ये संघा अनागता।
पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सब्बदा।
नत्थि मे सरणं अञ्ञं, संघो मे सरणं वरं।
एतेन सच्चवज्जेन, होतु मे जयमङगलं॥
उत्तमङ्गेन, वन्देहं, संघ ञ्च तिविधुत्तमं।
संघे यो खलितो दोसो, संघो खमतु तं ममं॥
यन्कीची रतनं लोके विज्जाती विविधा पतू 
रतनन संघ समनत्ति ,तस्मा सोत्थि भवन्तु ते